स्वदेशी उत्पादने, व्होकल फॉर लोकल: सणांच्या हंगामाच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे मन की बात मधून नागरिकांना आग्रहपूर्वक आवाहन
September 28th, 11:00 am
या महिन्याच्या मन की बातमधील भाषणात पंतप्रधान मोदींनी भगतसिंग आणि लता मंगेशकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. भारतीय संस्कृती, महिला सक्षमीकरण, देशभरात साजरे होणारे विविध सण, रा,स्व, संघाचा 100 वर्षांचा प्रवास, स्वच्छता आणि खादी विक्रीतील वाढ यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. स्वदेशीचा स्वीकार हाच देशाला स्वावलंबी बनवण्याचा मार्ग आहे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.थायलंडच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधानांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत केलेले निवेदन
April 03rd, 03:01 pm
पंतप्रधान शिनावात्रा यांनी अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. 28 मार्च रोजी झालेल्या भूकंपामध्ये बळी पडलेल्यांविषयी मी भारताच्या नागरिकांच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करतो. यामध्ये जे लोक जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आम्ही प्रार्थना देखील करतो.'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 28th, 11:30 am
मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.नवी दिल्लीत आयोजित भारत टेक्स 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 26th, 11:10 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, पियूष गोयल जी, दर्शना जरदोश जी, विविध देशांचे राजदूत, वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, फॅशन आणि वस्त्रोद्योग जगताशी संबंधित सर्व मित्र, तरुण उद्योजक, विद्यार्थी, आपले विणकर आणि आपल्या कारागीर मित्रांनो महोदया आणि महोदय! भारत मंडपम येथे आयोजित भारत टेक्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत ! आजचा हा कार्यक्रम खूप विशेष आहे. विशेष यासाठी आहे : कारण भारतातील दोन सर्वात मोठ्या प्रदर्शन केंद्रांमध्ये म्हणजेच भारत मंडपम आणि यशोभूमीमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी होत आहे. आज 3 हजाराहून अधिक प्रदर्शक... 100 देशांतील सुमारे 3 हजार खरेदीदार... 40 हजारांहून अधिक व्यापारी अभ्यागत... एकाचवेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. हा कार्यक्रम वस्त्रोद्योग कार्यक्षेत्रामधील सर्व भागधारकांना आणि संपूर्ण मूल्य साखळीतील लोकांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत टेक्स 2024 चे उद्घाटन
February 26th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमांपैकी एक अशा भारत टेक्स 2024 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या प्रदर्शनाची देखील पंतप्रधानांनी पाहणी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यु ट्युब प्रवास: जागतिक प्रभावाची 15 वर्षे
September 27th, 11:29 pm
माझ्या यु ट्युबर (YouTuber) मित्रांनो, आज एक यु ट्युबर म्हणून तुमच्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होत आहे. मीही तुमच्या सारखाच आहे, कोणी वेगळा नाही. गेली पंधरा वर्ष मी ही देशाशी आणि जगाशी यु ट्युबच्या माध्यमातून जोडला गेलो आहे. माझ्याकडेही अनेक सब्स्क्रायबर्स आहेत .पंतप्रधानांनी यूट्यूब फॅनफेस्ट इंडिया 2023 मध्ये यूट्यूबर्सना केले संबोधित
September 27th, 11:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यूट्यूब फॅनफेस्ट इंडिया 2023 मध्ये यूट्यूबर्सच्या समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांनी देखील युट्यूबवर आपला 15 वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून या कार्यक्रमात त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून जागतिक प्रभाव निर्माण करण्याचा आपला अनुभव सामाईक केला.पंतप्रधान दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर 16 फेब्रुवारी रोजी आदि महोत्सवाचे करणार उद्घाटन
February 15th, 08:51 am
देशातील आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी पावले उचलण्यात पंतप्रधान अग्रभागी आहेत, त्याचबरोबर देशाच्या वृद्धी आणि विकासामध्ये आदिवासींनी दिलेल्या योगदानाचा आदर पंतप्रधानांकडून केला जातो. राष्ट्रीय मंचावर आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, दि. 16 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर सकाळी 10:30 वाजता आदी महोत्सव या राष्ट्रीय आदिवासी महा-महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबरला अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर
November 17th, 03:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. पंतप्रधान, सकाळी सुमारे 9:30 वाजता, इटानगर इथल्या डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन करतील आणि 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केन्द्र राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पोहोचतील, तेथे दुपारी 2 वाजता ते ‘काशी तमिळ संगमम्’चे उद्घाटन करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (93 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
September 25th, 11:00 am
माझ्या प्रिय देशवासियांनों, गेल्या काही दिवसांत चित्ता या विषयाने आपले सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्त्यांबद्दल बोलू इच्छिणारे अनेक संदेश मिळाले आहेत. उत्तर प्रदेशमधले अरुणकुमार गुप्ताजी, तेलंगणामधले के. एन. रामचंद्रन रघुराम जी, गुजरातमधले राजन जी, दिल्लीचे सुब्रत जी अशा अनेकांनी संदेश पाठवले आहेत. चित्ता भारतात परतल्याबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. 130 कोटी भारतीय आनंदी आहेत, त्यांना अभिमान वाटतो आहे - हे भारताचे निसर्गप्रेम आहे. यासंदर्भात सर्व लोक एक प्रश्न आवर्जून विचारत आहेत की, मोदीजी, आम्हाला चित्ता बघायची संधी कधी मिळणार?राष्ट्रीय हातमाग दिनी पंतप्रधानांकडून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला अभिवादन
August 07th, 02:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हातमाग दिनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला आणि भारताच्या कलात्मक परंपरांची जोपासना करण्यासाठी काम करत असलेल्या सर्वांना अभिवादन केले आहे. स्टार्ट अप्सशी संबंधित युवा वर्गाने हातमागविषयक स्टार्टअप ग्रँड चॅलेंज या स्पर्धेत सहभागी होण्याचे देखील पंतप्रधानांनी आवाहन केले आहे.Taxpayer is respected only when projects are completed in stipulated time: PM Modi
June 23rd, 01:05 pm
PM Modi inaugurated 'Vanijya Bhawan' and launched the NIRYAT portal in Delhi. Referring to the new infrastructure of the Ministry, the Prime Minister said that this is also time to renew the pledge of ease of doing business and through that ‘ease of living’ too. Ease of access, he said, is the link between the two.PM inaugurates 'Vanijya Bhawan' and launches NIRYAT portal
June 23rd, 10:30 am
PM Modi inaugurated 'Vanijya Bhawan' and launched the NIRYAT portal in Delhi. Referring to the new infrastructure of the Ministry, the Prime Minister said that this is also time to renew the pledge of ease of doing business and through that ‘ease of living’ too. Ease of access, he said, is the link between the two.पंतप्रधान 3 जून रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
June 02nd, 03:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जून 2022 रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान इंदिरा गांधी प्रतिष्ठान, लखनौ येथे पोहोचतील.तिथे ते उत्तरप्रदेश गुंतवणूकदार परिषदेच्या तिसऱ्या (3.0) पायाभरणी सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी 1:45 च्या सुमाराला , पंतप्रधान कानपूरच्या पारौंख गावात पोहोचतील, तिथे ते माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत पाथरी माता मंदिराला भेट देतील.त्यानंतर, दुपारी 2 च्या सुमाराला , ते डॉ. बी.आर. आंबेडकर भवनाला भेट देतील, त्यानंतर 2:15 वाजता मिलन केंद्राला भेट देतील.हे केंद्र माननीय राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित घर आहे, जे सार्वजनिक वापरासाठी दान करण्यात आले आणि त्याचे रूपांतर समुदाय केंद्र (मिलन केंद्र) मध्ये करण्यात आले. त्यानंतर ते दुपारी 2:30 वाजता पारौंख गावात सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील.पंतप्रधान 4 जानेवारीला मणिपूर आणि त्रिपुराचा दौरा करणार
January 02nd, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जानेवारी 2022 रोजी मणिपूर आणि त्रिपुरा राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता, पंतप्रधान इंफाळमध्ये 4800 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 22 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, दुपारी २ वाजता, आगरतळा येथे, महाराजा बीर बिक्रम विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन आणि दोन प्रमुख विकास उपक्रमांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.पूर्वांचल द्रूतगती मार्गाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 16th, 01:23 pm
ज्या भूमीवर हनुमंताने कालनेमीचा वध केला आहे, त्या भूमीच्या लोकांना मी प्रणाम करतो. 1857 च्या लढ्यामध्ये इथल्याच लोकांनी इंग्रजांना सळोपळो करून सोडले होते. या भूमीतल्या मातीच्या कणा- कणाला स्वातंत्र्य संग्रामाचा सुगंध आहे. कोइरीपूरच्या लढ्याचे कोणाला विस्मरण होणार आहे? आज या पवित्र भूमीला, पूर्वांचल द्रूतगती मार्गाची भेट मिळाली आहे. तुम्हा सर्वांची अनेक दिवसांपासूनची मागणी आता पूर्ण झाली आहे. याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप- खूप अभिनंदन!पंतप्रधानांच्या हस्ते पुर्वांचल एक्स्प्रेस वे चे उद्घाटन
November 16th, 01:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुर्वांचल एक्स्प्रेसवे चे उद्घाटन झाले. सुलतानपूर जिल्ह्यातील एक्स्प्रेसवेवर बांधलेल्या 3.2 किलोमीटर लांबीच्या धावपट्टीवरून झालेल्या एअरशोचे अवलोकनही त्यांनी केले.पंतप्रधानांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त स्थानिक हातमाग उत्पादनांना पाठिंबा देण्याचे केले आवाहन
August 07th, 01:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की हातमागामध्ये भारताची विविधता आणि असंख्य विणकर आणि कारागीरांचे कौशल्य दिसून येते. त्यांनी स्थानिक हातमाग उत्पादनांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्य प्रदेशातल्या लाभार्थींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
August 07th, 10:55 am
मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि माझे खूप जुने परिचित, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन आदिवासी कल्याणासाठी, जनजाती समाजाच्या उत्कर्षासाठी झिजवलं, असे मध्य प्रदेशचे राज्यपाल श्रीमान मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह, राज्य सरकारचे इतर सर्व मंत्रीवर्ग, खासदार, आमदार सहकारी आणि मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून जोडले गेलेले बंधू आणि भगिनी!प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्यप्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद
August 07th, 10:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्यप्रदेशातील लाभार्थ्यांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी अधिक जनजागृती करण्यासाठी एक मोहीम सध्या सरकारतर्फे चालवली जात आहे. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी, राज्यसरकार ही मोहीम राबवत आहे. मध्यप्रदेशात सात ऑगस्ट हा दिवस प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना दिवस म्हणून साजरा केला जातो. मध्यप्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मध्यपरदेशात सुमार पाच कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.