Prime Minister pays homage to Shyamji Krishna Varma on his death anniversary
March 30th, 09:50 am
The Prime Minister, Shri Narendra Modi paid homage to the brave son of Mother India, Shyamji Krishna Varma, on his death anniversary, today. Shri Modi stated that with his revolutionary ideas, he awakened a new consciousness in the freedom movement. “His life and ideals will continue to inspire every generation of the country towards national service”, Shri Modi added.Prime Minister pays tribute to Bhagat Singh, Rajguru, and Sukhdev on Shaheed Diwas
March 23rd, 08:29 am
On the occasion of Shaheed Diwas, PM Modi paid rich tributes to the great freedom fighters Bhagat Singh, Rajguru and Sukhdev. Lauding their bravery, he observed that the martyrdom of these iconic heroes for the nation remains deeply etched in India's collective memory. He highlighted that they chose the path of sacrifice with conviction, placing the nation above their own lives..पुद्दुचेरीमधील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
March 01st, 12:00 pm
पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी, माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी मनसुख मांडवीय, पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन, सभापती आर. सेल्वम, गृहमंत्री ए. नमस्सिवायम, इतर नेते, पुद्दुचेरीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, वणक्कम्!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरीमध्ये 2700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली
March 01st, 11:45 am
यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, पुद्दुचेरी ही सिद्ध, संत, कवी आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे, जिथे महाकवी सुब्रमण्य भारती यांनी राष्ट्रवादाची ज्योत पेटवली आणि श्री अरविंद व माताजींनी जगाला आध्यात्मिक दृष्टी प्रदान केली.पंतप्रधानांनी वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
February 26th, 11:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान क्रांतिकारक वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले.वीर सावरकरांच्या जीवनातील शिकवण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
February 26th, 10:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकरजींच्या जीवनातील शिकवणीवर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित ‘राजाजी उत्सवा’चे पंतप्रधानांकडून कौतुक ज्यात श्री चक्रवर्ती राजगोपालाचारी जी यांना सन्मानित करण्यात आले ; देशाच्या भाग्याला आकार देणाऱ्यांना गौरवण्याचा आणि वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष दूर करण्याचा भारताचा संकल्प यातून प्रतिबिंबित होतो
February 23rd, 05:12 pm
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक मंडपाजवळील ग्रँड ओपन स्टेअरकेस येथे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.पंतप्रधान गांधी स्मृती येथे प्रार्थना सभेमध्ये झाले सहभागी
January 30th, 07:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज गांधी स्मृती येथे आयोजित प्रार्थना सभेत सहभागी झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, बापूंच्या प्रयत्नांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा दिली आणि भारताच्या वाटचालीवर एक अमिट ठसा उमटवला, त्याचा प्रभाव पिढ्यानपिढ्या प्रत्ययास येतो.अंदमान आणि निकोबार व्दीपसमूहावर पराक्रम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे केलेले भाषण
January 23rd, 05:15 pm
नमस्कार ! अंदमान-निकोबारचे नायब राज्यपाल अॅमिरल डी. के. जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए न्यासाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आर.एस. छिकारा, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामधील सहभागी आणि आयएनएचे शाश्वत पुरूष लेफ्टनंट आर माधवन् !!अंदमान आणि निकोबार बेटांवरील पराक्रम दिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले संबोधित
January 23rd, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांवरील पराक्रम दिन कार्यक्रमाला संबोधित केले. 23 जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा दिन म्हणजे गौरवशाली तारीख असल्याचे त्यांनी नमूद केले. नेताजींचे शौर्य आणि धाडस आपल्याला प्रेरणा देते आणि आपले मन त्यांच्याबद्दलच्या आदराने भारून जाते असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत पराक्रम दिन हा देशभावनेचा अविभाज्य सोहळा बनला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.पंतप्रधानांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे केले स्मरण
December 19th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, की गोवा मुक्ती दिन देशाला भारताच्या राष्ट्रीय प्रवासातील एका निर्णायक अध्यायाची आठवण करून देतो. अन्याय स्वीकारण्यास नकार दिलेल्या आणि धैर्याने आणि दृढनिश्चयाने स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांच्या अदम्य साहसाचे त्यांनी स्मरण केले. गोव्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत असताना त्यांचे बलिदान राष्ट्राला सतत प्रेरणा देत राहते असे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधानांनी सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली श्रद्धांजली
December 10th, 09:37 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, बौद्धिक व्यक्तिमत्व आणि राजकारणी म्हणून त्यांचे स्मरण करत पंतप्रधानांनी नमूद केले आहे, की राजाजी हे विसाव्या शतकातील सर्वात कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या विचारवंतांपैकी एक आहेत, ज्यांनी मूल्यनिर्मिती आणि मानवाच्या सन्मानाचे जतन करण्यावर विश्वास ठेवला.गुजरातमध्ये देडियापाडा येथे जनजातीय गौरव दिन कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
November 15th, 03:15 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीश विश्वकर्मा जी, गुजरात सरकारमधले मंत्री नरेश भाई पटेल, जयराम भाई गामीत जी, संसदेतले माझे जुने मित्र मनसुख भाई वसावा जी, भगवान बिरसा मुंडा यांचा परिवारातले व्यासपीठावर उपस्थित सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे आदिवासी बंधुभगिनी, अन्य सर्व आदरणीय व्यक्ती आणि आत्ता देशात सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांमधून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याशी जोडले गेलेले अनेक लोक, राज्याराज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री अशा सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला केले संबोधित
November 15th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. माँ नर्मदेची पवित्र भूमी आज आणखी एका ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार होत आहे असे सांगून, मोदी यांनी भारताची एकता आणि विविधता साजरी करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची 150 वी जयंती याच ठिकाणी साजरी करण्यात आली होती, भारत पर्वाची सुरुवात झाली होती याची आठवण करून दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या भव्य सोहळ्यासह भारत पर्वचा समारोप होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले .या शुभ प्रसंगी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि संपूर्ण आदिवासी पट्ट्यात स्वातंत्र्याची भावना जागृत करणाऱ्या गोविंद गुरुंचे आशीर्वाद देखील या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. व्यासपीठावरून त्यांनी गोविंद गुरुंना आदरांजली वाहिली. थोड्या वेळापूर्वी देवमोगरा मातेच्या मंदिराला भेट देण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभले असे ते म्हणाले.वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 07th, 10:00 am
वंदे मातरम, हे शब्द एक मंत्र आहेत,एक उर्जा आहे,एक स्वप्न आहे,एक संकल्प आहे.वंदे मातरम,हे शब्द भारत मातेची साधना आहेत,भारत मातेची आराधना आहे. वंदे मातरम हे शब्द आपल्याला इतिहासात घेऊन जातात.आपल्या आत्मविश्वासाला,आपल्या वर्तमानाला आत्मविश्वासाचे बळ देतात आणि आपल्या भविष्याला नवी उमेद देतात की असा कोणताही संकल्प नाही, असा कोणताही संकल्प नाही जो साध्य होऊ शकत नाही.असे कोणतेही लक्ष्य नाही जे आपण भारतवासीय साध्य करू शकत नाही.“वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
November 07th, 09:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, वंदे मातरम् हे केवळ शब्द नव्हेत – हा एक मंत्र आहे, एक उर्जा, एक स्वप्न आणि एक पवित्र निश्चय आहे. वंदे मातरम् हे भारतमातेप्रति भक्ती आणि आध्यात्मिक समर्पण यांचे मूर्त रूप आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा एक शब्द आपल्याला आपल्या इतिहासाशी जोडतो, आपला वर्तमानकाळ आत्मविश्वासाने भरून टाकतो आणि आपल्या भविष्यकाळाला असा धीर देण्यासाठी प्रेरित करतो की, कोणताही निश्चय पूर्ण होणार नाही असा नसतो आणि कोणतेही ध्येय आपल्या आवाक्याबाहेर नसते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले
October 31st, 06:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मध्ये रोहिणी येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, आत्ताच ऐकलेल्या मंत्रांची ऊर्जा आपल्या सर्वांना अजूनही जाणवत आहे. आपण जेव्हा अशा संमेलनात येतो तेव्हा आपल्याला दैवी आणि विलक्षण अनुभव येतो, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी या भावनेचे श्रेय स्वामी दयानंद यांच्या आशीर्वादाला दिले. पंतप्रधानांनी स्वामी दयानंद यांच्या आदर्शांबद्दल आदर व्यक्त केला. उपस्थित सर्व विचारवंतांबरोबरच्या अनेक दशकांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आपल्याला वारंवार त्यांच्यामध्ये येण्याची संधी मिळत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की जेव्हा ते त्यांना भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा आणि एक अनोखी प्रेरणा निर्माण होते.श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या वारशाच्या परिपूर्ततेला पंतप्रधानांनी केले अधोरेखित, त्यापासून प्रेरणा घेण्याचे युवा वर्गाला केले आवाहन
October 04th, 11:11 am
स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या कित्येक वर्षे अपूर्ण राहिलेल्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी सुमारे दोन दशकांपूर्वी झालेल्या अतिशय समाधानकारक सखोल राष्ट्रीय प्रयत्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केले. श्यामजी कृष्ण वर्मा यांचे 1930 मध्ये निधन झाले, त्यावेळी त्यांनी आपल्या अस्थी एक दिवस स्वतंत्र भारतात परत येतील या आशेवर देह ठेवला होता. त्यांची ही एकमेव इच्छा कित्येक वर्षे अपूर्ण राहिली होती, जी ऑगस्ट 2003 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथून परत आणण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलून पूर्ण केली.पंतप्रधानांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली श्रद्धांजली
October 04th, 09:16 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांनी केलेल्या समर्पणाचे स्मरण केले.