भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रवासातील उल्लेखनीय गतीवर पंतप्रधानांनी टाकला प्रकाश
June 05th, 05:10 pm
भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रवासाने आता उल्लेखनीय गती घेतली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. एअरट्रंक कंपनीने, भारतात सुमारे 3 लाख कोटी रुपये (30 अब्ज डॉलर्स) गुंतवणूक करण्याची आणि 5 गिगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ही देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधा व्यवस्थेमधील सर्वात मोठ्या प्रस्तावित गुंतवणुकींपैकी एक असल्याचेही त्यांनी नमूद केले.Rozgar Mela reflects our Government’s commitment to empowering the Yuva Shakti with new opportunities: PM Modi
May 23rd, 11:15 am
At the 19th Rozgar Mela, PM Modi distributed over 51,000 appointment letters and said India’s growing investments, global partnerships and expanding sectors are creating new opportunities for the youth. He highlighted rising opportunities across technology, manufacturing, startups, defence, infrastructure and public service as India moves towards the vision of Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात 51,000 हून अधिक तरुणांना शासकीय नियुक्ती पत्रांचे वाटप
May 23rd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे 19 व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हा दिवस देशभरातील हजारो तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सरकारी सेवेत नव्याने रुजू झालेल्या सर्व तरुणांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी रेल्वे, बँकिंग, संरक्षण, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांतील भारताच्या विकासात हे तरुण लवकरच महत्त्वपूर्ण योगदान देतील, यावर त्यांनी भर दिला. येत्या काळात तुम्ही सर्वजण विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहात, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.The future of farming lies not merely in "Produce More,” but in "Produce Better": PM Modi at FAO
May 20th, 11:00 pm
Accepting the Agricola Medal for 2026 from the FAO, PM Modi said the recognition reflected India’s commitment to human welfare, food security and sustainable development. He dedicated the honour to Indian farmers and the country’s agricultural scientific community. He also highlighted initiatives such as ‘Per Drop More Crop’, micro-irrigation and precision farming, which are guiding India’s agricultural policies.पंतप्रधानांना रोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे 'ॲग्रिकोला पदक' प्रदान
May 20th, 10:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (एफएओ) रोम येथील मुख्यालयात 2026 साठी प्रतिष्ठेच्या 'ॲग्रिकोला’ पदकाने सन्मानित करण्यात आले. भारतात आणि जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा, शाश्वत कृषी आणि ग्रामीण विकास, यासारख्या क्षेत्रांमधील त्यांच्या असाधारण नेतृत्वाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.भारत-इटली संयुक्त जाहीरनामा
May 20th, 10:28 pm
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 19-20 मे 2026 रोजी इटलीचा अधिकृत दौरा केला. याआधी, 2023 मध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जी-20 शिखर परिषदेसाठी, भारतात आल्या होत्या तसेच पंतप्रधानांनी जून 2024 मध्ये जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने इटलीचा दौरा केला होता, त्यानंतर पंतप्रधानांचा हा इटली दौरा झाला, यातून द्विपक्षीय संबंधाना एक नवी ऊर्जा आणि गती मिळाली आहे. दोन्ही नेत्यांनी या भेटीत, भारत-इटली संबंध, विशेष धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला.नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 18th, 04:44 pm
मी गेल्या वर्षीच नॉर्वेच्या दौऱ्यावर येणार होतो, मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तो दौरा मला स्थगित करावा लागला. त्या कठीण कालखंडात नॉर्वेने दहशतवादाविरोधात भारतासोबत खंबीरपणे उभे राहून खऱ्या मैत्रीची प्रचिती दिली. आज नॉर्वेमध्ये आलेलो असताना, त्या वेळी दाखवलेल्या एकजुटीबाबत मी मनापासून आभार व्यक्त करतो.पंतप्रधानांचे एनएक्सटी शिखर परिषदेतील भाषण
March 12th, 10:47 pm
आजचा हा 12 मार्चचा दिवस ऐतिहासिक आहे. 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी साबरमती इथून दांडी यात्रा सुरू केली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला हा एक निर्णायक टप्पा होता. या यात्रेमुळे देशभरातील लोक एका ध्येयाने एकत्र आले, भारताला स्वतंत्र करण्याचे ध्येय! आज या ऐतिहासिक यात्रेला जवळपास 100 वर्ष होत आली असताना आपण पुन्हा एक नवी यात्रा सुरू केली आहे; ती म्हणजे विकसित भारत यात्रा! विकसित भारत हे आपल्या सर्वांचेच ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यामध्ये अशा परिषदांमधून झालेल्या विचारमंथनातील निष्कर्ष खूप उपयोगी ठरतात. मला एनएक्सटी शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. इथे देशभरातले तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले बरेच मित्र उपस्थित आहेत. त्यातल्या काही जणांशी माझी जुनी ओळख आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन एक्स टी शिखर परिषदेला केले संबोधित
March 12th, 08:30 pm
पंतप्रधानांनी आज आयटीव्ही नेटवर्कच्या एनएक्सटी शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी दांडी यात्रेच्या ऐतिहासिक वर्धापनदिनाचे स्मरण केले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना आजच्या विकसित भारत घडवण्याच्या प्रयत्नांशी केली. 1930 च्या दांडी यात्रेने देशाला स्वातंत्र्याकडे एकजूट केले त्याचप्रमाणे सध्याचे विकसित भारत अभियान हे 140 कोटी भारतीयांचा सामूहिक संकल्प आहे, यावर मोदी यांनी भर दिला. आज, त्या ऐतिहासिक यात्रेनंतर जवळजवळ 100 वर्षांनी आपण भारतीय पुन्हा एकदा 'विकसित भारत' साठी एका नवीन प्रवासाला निघालो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.कृषी आणि ग्राम परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनामधील पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवाद.
March 06th, 01:14 pm
अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील तिसऱ्या वेबिनारमध्ये, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. याआधी, तंत्रज्ञान, सुधारणा आणि आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन वेबिनार झाले आहेत. आज, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होत आहे. तुम्ही सगळ्यांनी अर्थसंकल्प तयार करण्यात तुमच्या मौल्यवान सूचनांच्या माध्यमातून खूप सहकार्य केले आणि तुम्ही पाहिले असेल, अर्थसंकल्पात तुम्हा सगळ्यांच्या सूचना प्रतिबिंबित झाल्या आहेत, खूप कामी आल्या आहेत. पण आता अर्थसंकल्प सादर झाला आहे, या अर्थसंकल्पानंतर त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ देशाला मिळावा, या दिशेनेही तुमचा अनुभव, तुमच्या सूचना आणि सुलभ रितीने अर्थसंकल्पाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळायला हवा. अर्थसंकल्पातील एकेक पैसा ज्या हेतूने दिला गेला आहे, तो पूर्ण कसा करता येईल? लवकरात लवकर कसा करता येईल? तुमच्या सूचना या वेबिनारसाठी खूप महत्वाच्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कृषी आणि ग्रामीण परिवर्तनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित
March 06th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'कृषी आणि ग्रामीण परिवर्तन' या विषयावर भर असलेल्या तिसऱ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाशी संबंधित मागील सत्रांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी नमूद केले की, अर्थसंकल्प तयार करताना भागधारकांनी मोलाचे सहकार्य केले होते. आता, अर्थसंकल्पानंतर हे तितकेच महत्त्वाचे आहे की देशाला त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ मिळावा, आणि या दृष्टीने तुमच्या सूचना आणि हा अर्थसंकल्पोत्तर वेबिनार अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर मोदी यांनी यावर भर दिला.फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती यांच्या भारत भेटीबाबत भारत-फिनलंड संयुक्त निवेदन
March 05th, 08:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती डॉ. अलेक्झांडर स्टब 4 ते 7 मार्च 2026 दरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर आले आहेत. आपल्या विद्यमान पदावर कार्यरत असताना राष्ट्रपती स्टब हे प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते नवी दिल्ली आणि मुंबईला भेट देत आहेत. त्यांच्यासोबत फिनलंडच्या हवामान आणि पर्यावरण मंत्री सारी मुलताला, फिनलंडचे रोजगार मंत्री मतियास मार्टिनेन तसेच अनेक अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. पंतप्रधान मोदी यांनी 5 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे 11 व्या रायसीना संवादाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात फिनलँड चे राष्ट्रपती स्टब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी उद्घाटनप्रसंगी मुख्य भाषण दिले. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी फिनलंड प्रजासत्ताकाचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांच्या भारत भेटीनंतर राष्ट्रपती स्टब यांचा हा दौरा होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी 'शेती आणि ग्रामीण परिवर्तन ' या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करणार
March 05th, 06:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दि. 6 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी, शेती आणि ग्रामीण परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.न्यूज 18 रायझिंग भारत समिटमधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 27th, 08:30 pm
आपण सर्वजण रायझिंग भारताची चर्चा करत आहोत. आणि यामध्ये स्ट्रेंथ विदिन यावर तुम्हा सर्वांचा भर आहे, म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर, आपलं स्वतःचं सामर्थ्य हा तुमचा प्रमुख मुद्दा आहे. आणि आपल्याकडे शास्त्रांमध्ये तर म्हटलंच आहे - तत् त्वम असि! म्हणजे ज्या ब्रह्माच्या शोधात आपण निघालो आहोत, ते आपणच आहोच, ते आपल्यामध्येच आहे. जे सामर्थ्य आपल्या आतमध्येच आहे, तेच आपल्याला ओळखायचं आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये भारताने आपलं तेच सामर्थ्य ओळखलं आहे, आणि हे सामर्थ्य आणखी सशक्त करण्यासाठी आज देश अविरत प्रयत्न करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेटवर्क18 रायझिंग भारत शिखर परिषदेत भाषण
February 27th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्ट्रेंथ विदीन या विषयावर आधारित रायझिंग भारत शिखर परिषदेला संबोधित केले. पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षांतील भारताच्या प्रवासावर प्रकाश टाकत देशाचे गमावलेले सामर्थ्य पुन्हा प्राप्त करणे, आर्थिक स्वावलंबन आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्यासाठीचा आराखडा या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.नेसेट मधले पंतप्रधानांचे संबोधन
February 25th, 08:20 pm
या प्रतिष्ठीत सदनामध्ये उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची आणि सन्मानाची बाब आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या प्राचीन संस्कृतीला संबोधित करत आहे. माझ्यासमवेत 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आणि मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन मी आलो आहे.पंतप्रधानांनी केले इस्रायली संसद ‘नेसेट’ ला संबोधित
February 25th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेमध्ये इस्रायली संसद 'नेसेट'च्या एका विशेष अधिवेशनाला संबोधित केले. इस्रायली संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार निवेदनावेळी पंतप्रधानांचे वक्तव्य
February 21st, 12:30 pm
गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये आपण ज्या आत्मीयता आणि ऊबदार स्वागताने माझे स्वागत केले होते, त्याच भावनेने आज भारतात आपले अभिनंदन करीत आहे. हे माझ्यासाठी विशेष समाधानाचे कारण आहे. भारत आणि ब्राझीलमधील संबंधांना राष्ट्राध्यक्ष लूला यांच्या दूरदृष्टी आणि प्रेरणादायी नेतृत्वाचा दीर्घकाळ लाभ होत आला आहे.इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाक चे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्यात द्विपक्षीय बैठक
February 20th, 09:37 pm
नवी दिल्ली येथे 16-20 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भारत-एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाक चे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे.इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत नेत्यांच्या पूर्ण सत्रात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
February 19th, 01:00 pm
एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे भारतात स्वागत करताना मला आनंद होतो आहे. ही शिखर परिषद मानव-केंद्रित, संवेदनशील जागतिक एआय परिसंस्था तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास मला वाटतो.