पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतरत्न डॉ. भुपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आसामच्या गुवाहाटी येथील समारंभातील संबोधन

September 13th, 08:57 pm

मी म्हणेन भुपेन दा! आपण म्हणा अमर रहें! भुपेन दा, अमर रहे! अमर रहें! भुपेन दा, अमर रहे! भुपेन दा, अमर रहे! अमर रहे! आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा जी, अरुणाचल प्रदेश के युवा मुख्यमंत्री पेमा खांडू जी, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्वांनंद सोनोवाल जी, व्यासपीठावर उपस्थित भूपेन हजारिका जी यांचे बंधू श्री समर हजारिका जी, भूपेन हजारिकाजींची बहिण श्रीमती कविता बरुआ जी, भूपेन दा यांचे पुत्र श्री तेज हजारिका जी, तेज, केम छो! उपस्थित इतर मान्यवर आणि आसामधील माझ्या बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गुवाहाटी इथे झालेल्या भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंती सोहळ्याला केले संबोधित

September 13th, 05:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधील गुवाहाटी इथे झालेल्या भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंती सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. या आजचा दिवस अत्यंत उल्लेखनीय असून, हा क्षण खऱ्या अर्थाने अनमोल असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. आपण पाहिलेले कलाविष्काराचे सादरीकरण, अनुभवलेला उत्साह आणि त्यातल्या समन्वयाने आपण खूप भारावून गेलो असल्याची भावनाही त्यांनी उपस्थितांसोबत सामायिक केली. या संपूर्ण कार्यक्रमात भूपेन दा यांच्या संगीताचा ताल निनादत होता ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आपल्या मनात सतत भूपेन हजारिका यांच्या गाण्यातील काही शब्द रुंजी घालत असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांना सांगितला. भूपेन दा यांच्या संगीतलाटांचे तरंग सर्वत्र उमटत राहाव्यात अशी आपली आंतरिक इच्छाही त्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे पंतप्रधानांनी मनःपूर्वक कौतुक केले. आसामध्ये सादर होणारा प्रत्येक कार्यक्रम एक नवा विक्रम प्रस्थापित करणारा कार्यक्रम ठरतो, अशीच इथली उर्जा आहे असे ते म्हणाले. आज झालेले कलाविष्काराचे सादरीकरण अपवादा‍त्मक असल्याचे म्हणत, त्यांनी सर्व कलाकारांची प्रशंसा केली तसेच त्यांचे अभिनंदनही केले.

रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

May 23rd, 11:00 am

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मजुमदार जी, मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला जी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जी, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो जी, मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा जी, सर्व उद्योगपती, गुंतवणूकदार, बंधु आणि भगिनींनो…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन

May 23rd, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करताना, पंतप्रधानांनी ईशान्य प्रदेशाच्या भविष्याप्रति अभिमान, कळकळ आणि प्रचंड विश्वास व्यक्त केला. भारत मंडपम येथे अलिकडेच झालेल्या अष्टलक्ष्मी महोत्सवाची त्यांनी आठवण करून दिली आणि आजचा कार्यक्रम ईशान्य प्रदेशातील गुंतवणुकीचा उत्सव आहे यावर भर दिला. शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या उद्योग धुरिणांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. यातून या प्रदेशातील संधींबाबतचा उत्साह अधोरेखित झाला आहे असे ते म्हणाले. त्यांनी सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांचे अभिनंदन केले तसेच गुंतवणूक-पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी नॉर्थ ईस्ट रायझिंग शिखर परिषदेचे कौतुक केले आणि या प्रदेशाच्या निरंतर विकास आणि समृद्धीप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

गुवाहाटी येथील ऍडव्हान्टेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 25th, 11:10 am

आसामचे राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, उद्योग जगतातील नेते, मान्यवर, महिला आणि पुरुष,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ॲडव्हांटेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025 चे उद्घाटन

February 25th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे ॲडव्हांटेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025चे उद्घाटन केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पूर्व भारत आणि ईशान्य भारत आज भविष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत आणि ॲडव्हांटेज आसाम हा आसामची अफाट क्षमता आणि प्रगती, जगाशी जोडण्यासाठीचा एक मोठा पुढाकार आहे. भारताच्या समृद्धीत पूर्व भारताने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा इतिहास साक्षीदार आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली, आज आपण विकसित भारताकडे वाटचाल करत असताना पूर्व भारत आणि ईशान्य भारत त्यांची खरी क्षमता प्रदर्शित करतील. ॲडव्हांटेज आसाम त्याच भावनेचे प्रतिनिधित्व आहे, असे सांगून त्यांनी अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आसाम सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. 'ए फॉर आसाम' अशी ओळख निर्माण होईल, तो दिवस फार दूर नाही, असे मत पंतप्रधानांनी 2013 मध्ये व्यक्त केले होते. त्याला त्यांनी उजाळा दिला.

गुवाहाटी येथे झालेल्या बिहू कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण

April 14th, 06:00 pm

आजचे हे दृश्य, टेलिव्हिजनवर बघणारा असो, इथे कार्यक्रमात हजर असणारे असो आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. हे अविस्मरणीय आहे, अद्भुत आहे, अभूतपूर्व आहे, हा आसाम आहे. आसमंतात घुमणारा ढोल, पेपा अरु गॉगोनाचा आवाज संपूर्ण हिंदुस्तान ऐकत आहे. आसामच्या हजारो कलाकारांची ही मेहनत, हे परिश्रम, हा समन्वय आज सगळं जग मोठ्या अभिमानाने बघत आहे. एक तर इतका मोठा क्षण आहे, उत्सव इतका मोठा आहे, दुसरं म्हणजे आपला उत्साह आणि आपली भावना याला तोड नाही. मला आठवतं, जेव्हा विधानसभा निवडणुकांच्या काळात मी इथे आलो होतो, तेव्हा म्हणालो होतो की तो दिवस दूर नाही, जेव्हा लोग A पासून Assam म्हणतील. आज खरोखरच आसाम, A-One प्रदेश बनत आहे. मी आसामच्या लोकांना, देशाच्या लोकांना बिहुच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो.

आसाममध्ये गुवाहाटी येथे सारुसजाई स्टेडियममध्ये पंतप्रधानांनी केली 10,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

April 14th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे सारुसजाई स्टेडियममध्ये 10,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये पलाशभरी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलाची पायाभरणी, शिवसागरमध्ये रंगघरच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प यांची पायाभरणी, नामरुप येथील 500 टीपीडी मेन्थॉल प्रकल्पाचे उद्घाटन यांचा समावेश होता. यावेळी पंतप्रधानांनी दहा हजारांपेक्षा जास्त बिहू नर्तकांचा सहभाग असलेल्या बिहू नृत्याच्या रंगतदार सादरीकरणाचा देखील आनंद घेतला.

पंतप्रधानांनी आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात विकासप्रकल्पांचा आरंभ करताना केलेले भाषण

February 07th, 11:41 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोन रुग्णालयांची पायाभरणी केली आणि आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्ते यांच्यासाठी ‘आसाम माला’ हा कार्यक्रम सुरू केला. यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली, आसाम सरकारचे मंत्री आणि बोडोभूमी प्रादेशिक प्रांताचे प्रमुख प्रमोद बोरो उपस्थित होते.

पंतप्रधानांनी ‘आसाम माला’ चा शुभारंभ केला आणि आसाममधील दोन रुग्णालयांची पायाभरणी केली

February 07th, 11:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोन रुग्णालयांची पायाभरणी केली आणि आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्ते यांच्यासाठी ‘आसाम माला’ हा कार्यक्रम सुरू केला. यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली, आसाम सरकारचे मंत्री आणि बोडोभूमी प्रादेशिक प्रांताचे प्रमुख प्रमोद बोरो उपस्थित होते.

आसामच्या शिवसागरमध्ये भूमी पट्ट्यांच्या वितरण समारंभात पंतप्रधानांचे भाषण

January 23rd, 11:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसामच्या शिवसागर येथे स्थानिक आदिम भूमिहीनांना भू वितरण प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली उपस्थित होते.

आसामच्या शिवसागर येथे पंतप्रधानांच्या हस्ते मूळनिवासी स्थानिक कुटुंबांना भू-वितरण प्रमाणपत्र प्रदान

January 23rd, 11:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसामच्या शिवसागर येथे स्थानिक आदिम भूमिहीनांना भू वितरण प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली उपस्थित होते.

Previous government had made corruption a state of normalcy but we are uprooting this menace from the society: PM in Assam

February 09th, 01:44 pm

Prime Minister Narendra Modi addressed a huge public meeting in Amingaon, Assam today. Addressing the huge crowd of supporters, PM Modi said, “My government stands totally committed towards the welfare and progress of the Assamese people. We will ensure that the rights of the people and tribes of Assam are always protected.”

आसाम तेल नैसर्गिक वायू केंद्र म्हणून पुढे आणणार- पंतप्रधान पंतप्रधानांची गुवाहाटीला भेट

February 09th, 01:43 pm

अरुणाचल प्रदेश आसाम आणि त्रिपुरा दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीला भेट दिली. ईशान्य गॅस ग्रीडचे त्यांनी भूमिपूजन केले. राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांचे त्यांनी उद्‌घाटन केले. ईशान्‍येकडच्‍या राज्‍यांच्‍या इतिहासात नवा अध्याय आहे या प्रदेशाच्या वेगवान विकासाला आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना सांगितले. आसामची विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले. अंतरिम अर्थसंकल्प ईशान्‍येकडच्‍या राज्‍यांच्‍या 21 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवून सरकारची कटिबद्धता यातून प्रतीत होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

26 मे, 2017 रोजी ब्रह्मपुत्रा नदीवरील ढोला-सादिया पुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 26th, 12:26 pm

PM Narendra Modi inaugurated India’s longest bridge – the 9.15 km long Dhola-Sadiya Bridge built over River Brahmaputra in Assam. The Prime Minister said that infrastructure was extremely important for development. He added that the bridge would enhance connectivity between Assam and Arunachal Pradesh, and open the door for economic development on a big scale.

देशातल्या सर्वात लांब पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते आसाममध्ये उद्‌घाटन

May 26th, 12:25 pm

आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या 9.15 किलोमीटरच्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्‌घाटन केले. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातले दळणवळण सुलभ होणार असून प्रवासाचा मोठा वेळही वाचणार आहे. पुलाच्या उद्‌घाटनानंतर पंतप्रधानांनी काही मिनिटे पुलावरुन पायी प्रवास केला.