पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण : सुधारणा, आत्मनिर्भरता आणि प्रत्येक भारतीयाच्या सबलीकरणाचा दृष्टीकोन

August 15th, 10:23 am

79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेच्या आणि परिवर्तनाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, गेल्या दशकामध्‍ये भारताने रिफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (कामगिरी) आणि ट्रान्सफॉर्म (परिवर्तन) हा मार्ग स्वीकारला असून आता अधिक सामर्थ्याने पुढे जाण्याची वेळ आली आहे. सरकार एक आधुनिक, कार्यक्षम आणि नागरिक-अनुकूल परिसंस्था तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यात कायदे, नियम आणि प्रक्रिया सुलभ केल्या जातील, उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाईल आणि प्रत्येक भारतीय ‘विकसित भारत’ घडवण्यात आपले योगदान देऊ शकेल.