केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 02nd, 02:06 pm

आज भगवान आदि शंकराचार्य जी यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या जन्मभूमीला भेट देण्याचे सद्भाग्य मला लाभले होते. काशी या माझ्या लोकसभा मतदारसंघात विश्वनाथ धाम परिसरात आदि शंकराचार्य जी यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे याचा मला आनंद आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य देखील मला लाभले आहे. आणि आजच देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे द्वार दर्शनासाठी उघडले आहे, केरळमधून बाहेर पडून देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून आदि शंकराचार्य जी यांनी राष्‍ट्रीय चैतन्‍याची जाणीव जागृत केली. या पवित्र प्रसंगी मी त्यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो.

केरळमध्ये 8,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

May 02nd, 01:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे 8,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय सागरी बंदराचे लोकार्पण केले. भगवान आदि शंकराचार्य यांच्या जयंतीदिनाच्या मंगल प्रसंगी कार्यक्रमासाठी जमलेल्या उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या वंदनीय जन्मस्थानाला भेट देण्याचा सन्मान प्राप्त झाल्याची आठवण सांगितली. काशी या पंतप्रधानांच्या लोकसभा मतदारसंघात आदि शंकराचार्य यांचा भव्य पुतळा उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हा पुतळा म्हणजे आदि शंकराचार्य यांची प्रचंड अध्यात्मिक विद्वत्ता आणि शिकवण यांच्याप्रती आदरांजली प्रतीक आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपल्याला उत्तराखंडातील पवित्र केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचा सन्मान देखील प्राप्त झाला आहे. केदारनाथ मंदिराची कवाडे आज भाविकांसाठी खुली झाल्यामुळे, आजच्या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मुळचे केरळचे असलेल्या आदि शंकराचार्य यांनी देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून राष्‍ट्रीय चैतन्‍याची जाणीव जागृत केली, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आदि शंकराचार्य यांच्या प्रयत्नांनी एकसंघ आणि अध्यात्मिकदृष्ट्या जागृत भारताच्या उभारणीचा पाया रचला यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.

For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast

March 16th, 11:47 pm

PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद

March 16th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.

पंतप्रधान येत्या 21 ऑक्टोबरला केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देणार

October 18th, 10:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ऑक्टोबर 2021 रोजी उत्तराखंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. केदारनाथ इथे सकाळी साडेआठ वाजता ते केदारनाथाचे दर्शन आणि पूजा करतील. त्यानंतर 9 वाजताच्या सुमारास, त्यांच्या हस्ते केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी केली जाईल. त्यानंतर, ते आदि शंकराचार्य यांच्या समाधीचे दर्शन घेतील. 9.25 ला, पंतप्रधान मंदाकिनी अष्टपथ आणि सरस्वती अष्टपथाच्या विकासकामांचा आढावा घेतील.

केरळची जनता आता भाजपकडे नवीन आशा म्हणून पाहत आहे: पंतप्रधान मोदी

September 01st, 04:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये कोची येथे जाहीर सभेला संबोधित केले. ओणम निमित्त केरळच्या जनतेला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “ओणमच्या खास मुहूर्तावर मी केरळमध्ये आलो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना ओणमच्या खूप खूप शुभेच्छा,” , पंतप्रधान मोदी म्हणाले.

केरळमधील कोची येथे पंतप्रधान मोदींचे जाहीर सभेत भाषण

September 01st, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये कोची येथे जाहीर सभेला संबोधित केले. ओणम निमित्त केरळच्या जनतेला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “ओणमच्या खास मुहूर्तावर मी केरळमध्ये आलो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना ओणमच्या खूप खूप शुभेच्छा,” , पंतप्रधान मोदी म्हणाले.

पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 12th, 03:02 pm

पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल तमिलसाई जी, मुख्यमंत्री एन रंगासामी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नारायण राणेजी, अनुराग ठाकुरजी, निशीत प्रमाणिकजी, भानु प्रताप सिंह वर्माजी, पुदुचेरी सरकारमधील वरिष्ठ मंत्री, खासदार, आमदार, देशाच्या अन्य राज्यांमधील मंत्री आणि माझ्या युवा मित्रांनो! वणक्कम! तुम्हा सर्वाना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !

पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

January 12th, 11:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले.आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमा दरम्यान, पंतप्रधानांनी “माझ्या स्वप्नातील भारत ” आणि “भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे दुर्लक्षित नायक ” या विषयावरील निवडक निबंधांचे प्रकाशन केले. या दोन विषयांवर 1 लाखांहून अधिक तरुणांनी सादर केलेल्या निबंधांमधून हे निबंध निवडण्यात आले आहेत . पुदुच्चेरी येथे सुमारे 122 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह स्थापन करण्यात आलेल्या सूक्ष्म, लघु , मध्यम उद्योग मंत्रालयाच्या तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. पुदुच्चेरी सरकारने सुमारे 23 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या पेरुंथलैवर कामराजर मणिमंडपम - खुल्या रंगमंदिरासह प्रेक्षागृहाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, नारायण राणे, भानु प्रताप सिंह वर्मा आणि निसिथ प्रामाणिक, डॉ तमिलीसाई सौंदर्यराजन, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी, राज्यमंत्री आणि संसद सदस्य उपस्थित होते.

केदारनाथ इथे विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि राष्ट्रार्पण करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 05th, 07:50 pm

आज सर्व मठ, सर्व 12 ज्योतिर्लिंग, अनेक शिवालये, अनेक शक्तीधाम, अनेक तीर्थक्षेत्रांवर उपस्थित देशातील मान्यवर व्यक्ती, पूज्य संतगण, पूज्य शंकराचार्यांच्या परंपरेशी संलग्न सर्व ज्येष्ठ ऋषी-मुनी आणि अनेक भाविक देखील. देशाच्या कानाकोपऱ्यात आज केदारनाथच्या या पवित्र भूमीवर या पवित्र वातावरणात केवळ शरीरच नव्हे, तर आत्मिक स्वरुपात आभासी माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने जे तिथून आशीर्वाद देत आहेत.

केदारनाथ इथे पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास आणि विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित

November 05th, 10:20 am

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ इथे शिलान्यास आणि विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले. त्यांनी श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधीचे उद्घाटन केले आणि श्री आदि शंकराचार्य यांच्या अनावरण केले. तसेच कार्यान्वित आणि सुरु असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेत पाहणी केली. पंतप्रधानांनी केदारनाथ मंदिरातही पूजा केली. केदारनाथ धाम इथल्या कार्यक्रमासह देशभरातील बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम तसेच अनेक श्रद्धास्थानांवर प्रार्थना आणि उत्सव साजरा करण्यात आला, हे सर्व कार्यक्रम केदारनाथ धाम येथील मुख्य कार्यक्रमाशी जोडले होते.

पंतप्रधानांची 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथला भेट व श्री आद्य शंकराचार्य समाधीचे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन

October 28th, 06:17 pm

पंतप्रधान केदारनाथ मंदिरात प्रार्थना करतील. त्यानंतर ते श्री आद्य शंकराचार्य समाधीचे उद्‌घाटन करतील तसेच श्री आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरणही करतील. 2013 मध्ये आलेल्या पुराने नष्ट झालेल्या आदि शंकराचार्यांच्या समाधीची पुन्हा उभारणी करण्यात आली आहे. या पुनर्बांधणीचे काम पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रकल्पातील प्रगतीचा पंतप्रधान सातत्याने आढावा घेत होते तसेच त्यावर देखरेख करत होते. सरस्वती आस्थापथ येथे पूर्ण झालेल्या तसेच सुरू असलेल्या कामाचाही पंतप्रधान आढावा घेतील.

Srimad Bhagavadgita teaches us how to serve the world and the people: PM Modi

March 09th, 05:02 pm

PM Modi released a Manuscript with commentaries by 21 scholars on shlokas of Srimad Bhagavadgita. He noted that our democracy gives us freedom of our thoughts, freedom of work, equal rights in every sphere of our life. This freedom comes from the democratic institutions that are the guardians of our constitution. Therefore, he said, whenever we talk of our rights, we should also remember our democratic duties.

PM releases Manuscript with commentaries by 21 scholars on shlokas of Srimad Bhagavadgita

March 09th, 05:00 pm

PM Modi released a Manuscript with commentaries by 21 scholars on shlokas of Srimad Bhagavadgita. He noted that our democracy gives us freedom of our thoughts, freedom of work, equal rights in every sphere of our life. This freedom comes from the democratic institutions that are the guardians of our constitution. Therefore, he said, whenever we talk of our rights, we should also remember our democratic duties.

PM pays tribute to Adi Shankaracharya on his Jayanti

April 20th, 12:30 pm

Prime Minister Narendra Modi paid tribute to Adi Shankaracharya on his Jayanti. I bow to the great Adi Shankaracharya on his Jayanti. Spiritual and scholarly, his unparalleled wisdom as well as rich thoughts have left an indelible mark on our society. Adi Shankaracharya rightly emphasised on a healthy culture of learning, debate and discussion, the PM tweeted.